16.8 C
New York
मंगळवार, जून 17, 2025

Buy now

spot_img

जोगेश्वरी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षित कचरा पट्टीचा प्रश्न! नागरिक त्रस्त, आरोग्यास गंभीर धोका

दिः 17 जून 2025 .

गंगापूर तालुका, जि. औरंगाबाद –
ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी (ता. गंगापूर) परिसरातील कचरा पट्टीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या समस्येबाबत ग्रामपंचायत सदस्यांकडे तक्रार केली असून, प्रत्येकवेळी केवळ आश्वासने मिळतात, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.

oplus_1024

या कचरा पट्टीमुळे परिसरात दुर्गंधी, मच्छरांची उत्पत्ती, व संक्रामक आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले, वृद्ध व महिलांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत असून, नागरिकांना आपल्या घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया:
“आम्ही वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या संदर्भात तक्रार दिली, पंचायत सदस्यांनी ‘लवकरच काम सुरू होईल’ या वर विचार करून मिटींग घेऊन यावर उपाय काढू असे सांगितले, पण गेल्या कित्येक महिन्यांनंतरही काहीच झाले नाही. हा प्रकार आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. आमच्या आरोग्याशी खेळ चाललाय,” असे येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या समस्या सांगितल्या आहेत .

आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण:
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात झालेल्या अपयशामुळे डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक असून, तत्काळ उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.

निवेदनाची गरज:
नागरिकांनी आता एकत्र येऊन ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले की, “जर लवकरच योग्य तो उपाय न केला, तर मोठा लोकआंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”

🔴 प्रशासनाने लक्ष द्यावे आणि तातडीने कारवाई करावी, हीच जोगेश्वरीकरांची मागणी आहे.

प्रकाशपर्व न्युज मिडीया
आवाज वंचित बहुजनांचा
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी : रितेश साबळे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com