तिरुअनंतपुरम | १५ जून २०२५ – अमेरिकन वायुदलाच्या अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानाने आज सकाळी केरलमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हे लँडिंग करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे सविस्तर वर्णन F-35 हे अमेरिकेचे स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त आणि प्रगत क्षमतेचे लढाऊ विमान असून, हे विमान दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर नियमित सरावासाठी तैनात होते. विमानात उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ निर्णय घेऊन जवळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरायचे ठरवले. वैमानिक सुरक्षित आपत्कालीन लँडिंग दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने नेण्यात आले. विमानतळ प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी तत्परतेने पाऊले उचलली. वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत या लँडिंगमुळे तिरुअनंतपुरम विमानतळावरील नागरिक वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. सुरक्षा उपाययोजनांनंतर सेवा पूर्ववत करण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मदतीने हे लँडिंग अतिशय नियोजनबद्धरीत्या पार पडले.
आपत्कालीन लँडिंग दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने नेण्यात आले. विमानतळ प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी तत्परतेने पाऊले उचलली. वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत या लँडिंगमुळे तिरुअनंतपुरम विमानतळावरील नागरिक वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. सुरक्षा उपाययोजनांनंतर सेवा पूर्ववत करण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मदतीने हे लँडिंग अतिशय नियोजनबद्धरीत्या पार पडले.
ग्वालियर, जून 2025 — ग्वालियर हायकोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 10 फुटी पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी गेले काही महिने जोरदार आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण आता सामाजिक न्याय, न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान आणि राष्ट्रचिन्हाच्या प्रतीकात्मकतेचा मुद्दा बनले आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये वकिल विश्वजीत रतोनिया, धर्मेंद्र कुशवाहा, रायसिंह आदींनी मुख्य न्यायमूर्ती (CJI) सुलेश कुमार कैत यांच्याकडे पुतळा बसवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. CJI यांनी मौखिक मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ₹2 लाख खर्च करून मूर्ती तयार केली आणि जागा ठरवली.
11 जून रोजी भीम आर्मी भारत एकता मिशनने फुलबाग मैदानात महापंचायत घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना दुसरीकडे थांबवलं.यावेळी सपा खासदार रामजीलाल सुमन म्हणाले, “जर न्यायालयाने परवानगी दिली आहे, तर अजूनही अडथळे का?”बसपा नेत्या मायावती यांनी स्पष्टपणे विरोध करणाऱ्या वकिलांवर जातीयतेचा आरोप करत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.
एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं फ्लाइट १७१ हे बोईंग ७८७ विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच भीषण अपघातात कोसळलं. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी केवळ एकच प्रवासी वाचला असून, अपघाताच्या ठिकाणी जमिनीवर असलेल्या किमान २८ जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
ही दुर्घटना शहराच्या बाहेरील वस्तीत घडली असून, विमान एका रहिवासी भागात कोसळल्याने अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. धुराचे मोठे लोट, आगीचे भडकलेले ज्वाळांचे लोट, आणि बचाव कार्य सुरू असलेली धावपळ सध्या घटनास्थळी पाहायला मिळत आहे.
आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर सक्रिय
राज्य सरकार, एनडीआरएफ, आणि एअर इंडियाच्या ताफ्यातील पथके घटनास्थळी तातडीने दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दल, पोलिस, आणि डॉक्टरांचे पथकही मदतकार्य करत आहेत.
विमान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट
विमानाच्या दुर्घटनेमागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. याबाबत डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) आणि इतर विमानन तज्ज्ञांनी चौकशी सुरू केली आहे. प्रारंभिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाड किंवा यांत्रिक अडचण ही शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत गहिरा शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत आणि सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
प्रकाशपर्व न्यूज टीम या घटनेवर सतत लक्ष ठेवून आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.
🕊️ मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा.
कंधार तालुका प्रतिनिधी – बालाजी सुनिल गायकवाड – भारतीय सैन्यदलात १६ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले हवालदार आदिनाथ घुगे आपल्या जन्मभूमि त दाखल झाले.त्यांचा गावकऱ्यांनी सपत्नीक जंगी सत्कार केला.आदिनाथ घुगे यांनी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कार, प्रेम, स्नेह हा प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्न असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील संगमवाडी या गावी पाहायला मिळाला. १६ वर्ष देशाचं रक्षण करून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन हवालदार आदिनाथ घुगे सुखरूप घरी पोहोचला.
देशसेवा करून गावी पोहोचल्यावर जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावंच नव्हे, तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली. यावेळी पूर्ण गाव सजून-धजून उभं होतं. जवानाचा गावात प्रवेश होताच फटाक्याची आतीषबाजी करत कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. १६ वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
भारतीय सैन्य दलात आदीनाथ घुगे यांनी १६ वर्षे देशसेवा केली. सेवानिवृत्तीनंतर आपल्या जन्मभूमीत दि.३ जुन रोजी सुविद्य पत्नी आश्विनी घुगे सह त्यांचे आगमन झाले,त्यांचे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी वाजंत्री सह स्वागत केले यावेळी सुहासिनींनी ओवाळणी करून पुष्पवृष्टी केली,भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संगमवाडीचा परिसर दुमदुमून गेला.
लोहा येथील बालाजी मंदिर येथून रॅली कंधारकडे निघाली त्यांचा जागोजागी सत्कार करण्यात आला.कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परत रॅली संगमवाडी कडे निघाली रात्री ७ वाजता त्यांचे आगमन संगमवाडी येथे झाले.त्यांचे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी वाजंत्री सह स्वागत केले, कंधार तालुक्यातील संगमवाडी येथे रात्री ७ नंतर गावकऱ्यांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडी कडून भव्य दिव्य लोहा-कंधारचा पारंपारिक खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्कार आयोजित करण्यात आला होता.
सूत्रसंचालन भास्कर गित्ते यांनी केले तर प्रास्ताविक संभाजी घुगे यांनी मांडली तर आभार एकनाथ घुगे यांनी मानले . फौजी आमच्या गावचा कविता भास्कर गित्ते यांनी सादर केली.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की भारत देशातील जवान डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करतो,जवान सीमेवर लढतो म्हणून आपण सुखान राहतो प्रा.हाके म्हणाले,आपले मुलं बाळे शिकवली पाहिजे,गोरगरीब मुलांसाठी थोड थोड मार्गदर्शन करत जा त्यांचा फायदा गावांतील मुलांना होऊ द्या असे म्हणाले. आईवडिलांना वेळ द्या,तुम्ही इंडीयन आर्मी चे सैनिक आहात त्यांच्यातला वेळ काढून जे युवक आहेत,तो वाईट गोष्टी साठी गेला नाही पाहिजे त्यांना फ्री ट्रेनिंग द्या,जर तुम्हाला वेळ भेटला तर त्यातील थोडा वेळ गावांसाठी द्या गावकऱ्यांची सेवा करा असे चुकलवाड म्हणाले. यावेळी उपस्थित ओबीसी नेते लक्ष्मण हाके,चंद्रसेन पाटील सुरणर,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चुकलवाड,सरपंच प्रतिनीधी चक्रधर घुगे , केरबा केंद्रे,विजय केंद्रे, माधव मुसळे,उत्तम चव्हाण,व्यंकटी तेलंगे, रामकिशन मानसपुरे यांच्यासह पंचक्रोशीतील व गावांतील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.
जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्हाभर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने 9/6/ 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले
जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्हाभर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने 9/6/ 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने खालील विषय होते
1) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि महिला व बाल संगोपन योजनेला निधी मंजूर न करता लाडक्या बहिणीसाठी वापरला तो पुन्हा सामाजिक न्याय विभागाला वर्ग करण्यात यावा 2) संजय गांधी व श्रावण बाळ निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मानधन मिळाले पाहिजे 3) ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या कोणत्या कारणामुळे काढल्या त्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी व महिलांना न्याय देण्यात यावा 4) आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश फार्म ऑफलाइन स्वीकारले जावेत
5) सामाजिक न्याय विभाग मार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा निधी दुसऱ्यांदा अनुसूचित जातीचा 410 कोटी म्हणजेच आतापर्यंत 7000 कोटीचा निधी व आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा 335 कोटी आतापर्यंत आदिवासीचा 1007 कोटी लाडक्या बहिणीसाठी निधी वळविण्यात आला. ही बाब अत्यंत क्लेश दायक असून संविधानाची अवहेलना करणारी आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन वरील वापरलेला निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात यावा. महिला व बाल संगोपन योजनेला निधी मंजूर न करता सरकारला अनाथांचा विसर पडला त्यामुळे एक लाख मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तात्काळ हा निधी महिला व बालसंगोपन विभागाला उपलब्ध करून देण्यात यावा. 6) श्रावण बाळ जिल्ह्यात संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिल्या जाते मात्र गेल्या 3 महिन्यापासून सदर मानधन मिळालेले नाही. ही बाब गंभीर असून निराधारांना सरकार कायमस्वरूपी निराधार करते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध, विधवा, अपंग, निराधार नागरिकांसाठी हे मानधन जीवनावश्यक आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे. तरी हे मानधन निराधारांना ताबडतोब मिळाले पाहिजे.
7) ऊसतोड महिला कामगारांच्या 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढून घेतल्या. ही बाब समोर आल्यानंतर बीडमध्ये आरोग्य विभागाने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 मध्ये 2022 आरोग्य शिबिर आयोजित केली होती. सदर महिलांची काही अपवाद वगळता खाजगी दवाखान्यामध्ये गर्भ पिशवी काढण्याची ऑपरेशन झाली. कुणी याबाबत जबरदस्ती केली का ? या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून सत्य बाब उघडकीस आणावी व सदर ऊसतोड महिला कामगारांना न्याय देण्यात यावा. 8) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच या वर्षामध्ये ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुरू केली. असून त्याची मुदत पाच जून 2025 रोजी संपत आहे .आज रोजी या ऑनलाइन चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना फार मोठा त्रास होत आहे .वेबसाईट बंद किंवा नेटवर्क उपलब्ध नसणे इत्यादी तक्रारी विद्यार्थ्याकडून येत आहेत. कॉम्पुटर सेंटरवर मोठ्या प्रमाणावर लाईन लागली असून या विद्यार्थ्याकडून पैसा वसूल केला जात आहे. त्यामुळे मागच्या वर्षी ग्रामीण भागामध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिला जात होता. तीच पद्धत यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात यावी. तसेच या प्रवेश प्रक्रियेला 20 जून पर्यंत किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी.
वरील सर्व मागण्याची तात्काळ नोंद घेऊन त्या शासन दरबारी निकाली काढण्यात याव्या. अन्यथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शासनाला देण्यात आला यावेळी खामगाव येथे निवेदन सादर करण्यासाठी विशाखा ताई सावंत महिला जिल्हाध्यक्ष संघपाल जाधव उपसभापती क्रु. ऊ.बा. समिती , सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष, राजूभाऊ हॅलोडे संचालक क्रु. ऊ. बा. समिती, दादाराव हेलोडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, रमेश गवारगुरु, मनोहर जाधव, सुनील वाकोडे, शेषराव तायडे ,अंबादास दोडे ,बाळू मोरे ,राजवर्धन शेकोकार, मिलिंद कवडे, विशाल तायडे, जगदीश तिडके, नाना वानखेडे, युवराज पोळे, भारती जगताप, अनिता बोचरे ,अनिता चव्हाण ,दिलीप जाधव, बंडू भाऊ, इंगळे,प्रशांत दमदाडे, विजय मांडकेकर, विशाल हिवराळे गणेश जगताप, नंदा सुनील लांडगे, सीमा विनोद लांडगे, अनिता सिद्धार्थ नितोने, सुशीला जगदेव शिरसाठ, सपना गवई, विमल शिरसाठ, सुमन शिरसाट, यमुना शिरसाठ, प्रमिलाबाई सूर्यवंशी, निर्मलाबाई हिवराळे या संख्या महिला पुरुष उपस्थित होते
आपण सध्या ज्या समाजात जगतो, तिथे एकीकडे विज्ञानाची प्रगती सुरू आहे, आणि दुसरीकडे जुनाट अंधश्रद्धा, थोतांड व कर्मकांड अजूनही बळकटपणे मुळं रोवून आहेत. वटसावित्री पौर्णिमा हा असाच एक सण, जिथे बायकांनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करावा, झाडाभोवती फेऱ्या माराव्यात आणि कथाकथन करावं, असा सांस्कृतिक संकेत आहे.
मात्र, खरंतर याच समाजात सावित्रीबाई फुलेंनी १९व्या शतकात महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांनी स्त्रियांनी धर्मग्रंथ, कर्मकांडाच्या जोखडातून बाहेर पडून विचारस्वातंत्र्य मिळवावं, असं ठासून सांगितलं.
वटसावित्रीच्या कथेत ‘सावित्रीने आपला नवरा मृत्यूच्या तडाख्यातून परत आणला’ अशी आख्यायिका आहे. परंतु, याचा आजच्या काळातला अर्थ काय? स्त्रीने फक्त नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करावा आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावं — ह्या कल्पनेला सावित्रीबाईंच्या तत्वनिष्ठ विचारधारेत स्थानच नाही
सावित्रीबाई म्हणाल्या होत्या — “माणसाने स्वतःच्या हक्कांसाठी लढावं, प्रश्न विचारावे, आणि तर्कशुद्ध जीवन जगावं.”
आज विज्ञानयुगात आपण आहोत, तरीही स्त्रियांनी उपवास, देव-देवस्की, झाडाभोवती प्रदक्षिणा करून आपल्या आयुष्याला कर्मकांडात अडकवणं, हे केवळ थोतांड आहे. स्त्रियांनी आज सावित्रीबाईंच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन स्वतःसाठी, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे.
काही दिवस सण साजरा करणं चुकीचं नाही, पण तो करताना अंधश्रद्धा आणि बंधनं टाकणाऱ्या प्रथांना प्रश्न विचारणं, विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी दृष्टिकोन जोपासणं हेच खऱ्या अर्थाने सावित्रीसारखं आणि सावित्रीबाईंसारखं वागणं ठरेल.
सावित्रीबाई फुले: आंतरजातीय प्रेम आणि सामाजिक क्रांती – अजय जाधव – मुख्य संपादक प्रकाशपर्व न्युज
सावित्रीबाई फुले यांचे नाव भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. 1868 मध्ये घडलेली एक घटना त्यांच्या प्रगतशील विचारसरणीचे आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या घटनेत सावित्रीबाईंनी आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण यांना गुन्हा मानण्याऐवजी त्याकडे सहज मानवी व्यवहार म्हणून पाहिले आणि एका तरुणी आणि तिच्या प्रियकराला लिंचिंगपासून वाचवले, ही घटना त्या काळातील सामाजिक रूढींविरुद्ध त्यांच्या धाडसी आणि क्रांतिकारी भूमिकेचे प्रतीक आहे.
ऐतिहासिक संदर्भ आणि घटना– 19व्या शतकातील भारतात जातिव्यवस्था आणि सामाजिक रूढींनी समाजाला जखडून ठेवले होते. आंतरजातीय प्रेम किंवा विवाहपूर्व गरोदरपण यासारख्या गोष्टींना समाजात अत्यंत घृणास्पद आणि पापमय मानले जायचे. अशा परिस्थितीत 1868 मध्ये पुण्यात एका तरुणीला तिच्या आंतरजातीय प्रेमसंबंधामुळे आणि विवाहपूर्व गरोदरपणामुळे समाजाकडून लिंचिंगचा सामना करावा लागला. ही तरुणी आणि तिचा प्रियकर यांना समाजाने दोषी ठरवून मृत्युदंड देण्याचा प्रयत्न केला. ही बातमी सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला.
सावित्रीबाईंनी या प्रकरणाकडे केवळ सामाजिक बंड म्हणून नव्हे, तर मानवी भावना आणि हक्कांचा प्रश्न म्हणून पाहिले. त्यांनी या जोडप्याला संरक्षण देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी समाजातील रूढीवादी आणि हिंसक मानसिकतेचा सामना करत या तरुणी आणि तिच्या प्रियकराला वाचवले. सावित्रीबाईंनी या तरुणीला कलंकित मानले नाही, उलट तिला आधार दिला आणि तिच्या निवडीचा आदर केला. या घटनेने सावित्रीबाईंच्या मानवतावादी आणि समतावादी विचारसरणीची झलक स्पष्टपणे दाखवली.
सावित्रीबाईंचा दृष्टिकोन – सावित्रीबाईंच्या या कृतीमागे त्यांचा ठाम विश्वास होता की, प्रेम आणि मानवी नातेसंबंधांना जातीच्या किंवा सामाजिक बंधनांच्या चौकटीत अडकवता येत नाही. त्यांनी आंतरजातीय प्रेमाला आणि विवाहपूर्व गरोदरपणाला गुन्हा मानण्याऐवजी त्या व्यक्तींच्या भावनांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान केला. त्याकाळात अशा प्रकरणांना सामाजिक बहिष्कार किंवा हिंसेचा सामना करावा लागत असे, परंतु सावित्रीबाईंनी या तरुणीला समाजाच्या क्रूर दृष्टिकोनापासून वाचवले आणि तिला स्वीकारले.
सावित्रीबाईंनी या घटनेच्या माध्यमातून समाजाला एक संदेश दिला की, प्रेम आणि मानवी संबंध हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे आणि मानवतेचे प्रतीक आहेत. त्यांनी समाजातील रूढींना आव्हान देत सामाजिक सुधारणेचा पाया रचला. त्यांनी या तरुणीला केवळ संरक्षणच दिले नाही, तर तिला नवीन जीवन सुरू करण्यासाठी प्रोत्साहन आणि आधारही दिला.
सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा – सावित्रीबाईंच्या या कृतीचा प्रभाव त्या काळात आणि आजही समाजावर खोलवर झाला आहे. त्यांनी दाखवलेली धैर्य आणि मानवतावादी दृष्टिकोन आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. आजही आंतरजातीय विवाह आणि सामाजिक रूढींना आव्हान देणाऱ्या जोडप्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सावित्रीबाईंची ही घटना आजच्या समाजाला विचार करण्यास भाग पाडते की, प्रेम आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांना सामाजिक बंधनांपेक्षा वरचढ ठरवले पाहिजे.
सावित्रीबाईंचावारसा – सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षण आणि स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक समता आणि मानवतेच्या क्षेत्रातही क्रांती घडवली. 1868 मधील ही घटना त्यांच्या प्रगतशील विचारसरणीचे आणि सामाजिक रूढींविरुद्ध लढण्याच्या धैर्याचे उदाहरण आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही समाजाला प्रेम, स्वातंत्र्य आणि समतेच्या दिशेने प्रेरित करतो.
निष्कर्ष – सावित्रीबाई फुले यांनी 1868 मध्ये एका आंतरजातीय प्रेमी जोडप्याला लिंचिंगपासून वाचवून समाजाला एक नवा विचार दिला. त्यांनी आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण यांना गुन्हा मानण्याऐवजी त्याला मानवी भावनांचा आणि स्वातंत्र्याचा भाग म्हणून स्वीकारले. ही घटना त्यांच्या क्रांतिकारी आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. सावित्रीबाईंचा हा वारसा आजही समाजाला समता, स्वातंत्र्य आणि प्रेमाच्या मूल्यांचा आदर करण्याची शिकवण देतो. त्यांचे कार्य आणि विचारसरणी ही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.
अजय जाधव – मुख्य संपादक प्रकाशपर्व न्युज – 09328286049
Online Fraud in Mumbai : मुंबईत नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत सुमारे १५० गुन्हे दाखल झाले आहेत. लोअर परळमधील एका तरुणाला जर्मनीतील नोकरीच्या नावाखाली आठ लाख रुपयांचा गंडा घातला. मालाडमध्ये एका तरुणाला बोटीवर नोकरी देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये उकळले.
मुंबई : चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक बेरोजगाराचा कायम प्रयत्न सुरू असतो. परिचयातील व्यक्ती, राजकीय नेते किंवा एखादे ॲप यावर पटकन विश्वास ठेवला जातो. नोकरीसाठी काहीही करण्याची तयारी असलेले बेरोजगार त्यांच्या आश्वासनांना बळी पडतात. मुंबईमध्ये चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत नोकरीच्या नावाने फसवणुकीचे सुमारे १५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नोकरीच्या नावे आठ लाखांची फसवणूक
लोअर परळ येथील एक तरुण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात होता. त्याच दरम्यान, नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या एका ॲपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून एका व्यक्तीने त्याला फोन केला. जर्मनी येथील एका कंपनीसाठी निवडण्यात आल्याचे सांगत, या व्यक्तीने जर्मनी येथील कंपनीतून मुलाखतीसाठी फोन येईल असे सांगितले. त्यानुसार त्याला एक फोन आला आणि त्यावरून तिघांनी या तरुणाची ऑनलाइन मुलाखत घेतली. मुलाखत घेणाऱ्यांनी तरुणाच्या क्षेत्राशी निगडित प्रश्न विचारल्याने तरुणाला तिघांच्या बोलण्यावर विश्वास बसला.
मुलाखत घेणाऱ्यांनी नोकरीपूर्वी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगून माहितीचे पत्रक पाठवले. त्यामध्ये प्रोजेक्ट सर्टिफिकेट फी, वैद्यकीय चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अनामत ठेव, वर्क फ्रॉम होमसाठी साहित्य अशा वेगवेगळ्या कारणांसाठी रक्कम भरावी लागेल असे नमूद करण्यात आले होते. नोकरीची आवश्यकता असल्याने या तरुणाने वेगवेगळ्या खात्यांवर सुमारे आठ लाख रुपये पाठवले. मात्र त्यानंतर काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तरुणाने ई-मेलद्वारे संबंधित कंपनीशी संपर्क केला असता अशा प्रकारे मुलाखत किंवा पैसे कंपनीकडून स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले. या तरुणाच्या तक्रारीवरून याबाबत ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲपवर नोंदणीनंतर पैसे भरले, नंतर कार्यालय बंद
अन्य एका घटनेत, मालाडच्या दिंडोशी येथील एका तरुणाने नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या ॲपवर नोंदणी केली. काही दिवसांनी त्याला बोटीवर नोकरी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले. कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. नोकरी लागण्यापूर्वी किती आणि कशासाठी रक्कम द्यावी याबाबतही माहिती दिली. चांगल्या पगाराची नोकरी मिळत असल्याने तरुणाने तयारी दर्शवली आणि त्यांच्या सांगण्यानुसार सुमारे दोन लाख रुपये दिले. पैसे देऊन बराच कालावधी गेला तरी नोकरीचे काहीच न झाल्याने तरुणाने पुन्हा कार्यालय गाठले असता ते बंद आढळले. त्याच्यासोबत इतर अनेकांची अशी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले.
शिक्षिकेला फसवले
अंधेरीला राहणाऱ्या ३० वर्षीय शिक्षिकेने वांद्रे येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका या पदासाठी अर्ज केला होता. तिला एका अनोळखी व्यक्तीने फोन केला आणि वैद्यकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून निवड झाल्याचे सांगितले. काही प्रक्रियेसाठी ७६ हजार रुपये जमा करावे लागतील, असे या व्यक्तीने सांगितले. शिक्षिकेने त्याला ऑनलाइन रक्कम पाठवली. याबाबत कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली असता अशी प्रक्रिया पैसे घेऊन केली जात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.