17.5 C
New York
रविवार, जून 15, 2025

Buy now

spot_img

वटसावित्री : अंधश्रद्धेच्या सावलीत सावित्रीबाईंच्या विचारांची गरज

आपण सध्या ज्या समाजात जगतो, तिथे एकीकडे विज्ञानाची प्रगती सुरू आहे, आणि दुसरीकडे जुनाट अंधश्रद्धा, थोतांड व कर्मकांड अजूनही बळकटपणे मुळं रोवून आहेत. वटसावित्री पौर्णिमा हा असाच एक सण, जिथे बायकांनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करावा, झाडाभोवती फेऱ्या माराव्यात आणि कथाकथन करावं, असा सांस्कृतिक संकेत आहे.

मात्र, खरंतर याच समाजात सावित्रीबाई फुलेंनी १९व्या शतकात महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांनी स्त्रियांनी धर्मग्रंथ, कर्मकांडाच्या जोखडातून बाहेर पडून विचारस्वातंत्र्य मिळवावं, असं ठासून सांगितलं.

वटसावित्रीच्या कथेत ‘सावित्रीने आपला नवरा मृत्यूच्या तडाख्यातून परत आणला’ अशी आख्यायिका आहे. परंतु, याचा आजच्या काळातला अर्थ काय? स्त्रीने फक्त नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करावा आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावं — ह्या कल्पनेला सावित्रीबाईंच्या तत्वनिष्ठ विचारधारेत स्थानच नाही

सावित्रीबाई म्हणाल्या होत्या — “माणसाने स्वतःच्या हक्कांसाठी लढावं, प्रश्न विचारावे, आणि तर्कशुद्ध जीवन जगावं.”

आज विज्ञानयुगात आपण आहोत, तरीही स्त्रियांनी उपवास, देव-देवस्की, झाडाभोवती प्रदक्षिणा करून आपल्या आयुष्याला कर्मकांडात अडकवणं, हे केवळ थोतांड आहे. स्त्रियांनी आज सावित्रीबाईंच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन स्वतःसाठी, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे.

काही दिवस सण साजरा करणं चुकीचं नाही, पण तो करताना अंधश्रद्धा आणि बंधनं टाकणाऱ्या प्रथांना प्रश्न विचारणं, विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी दृष्टिकोन जोपासणं हेच खऱ्या अर्थाने सावित्रीसारखं आणि सावित्रीबाईंसारखं वागणं ठरेल.

सणांचा सन्मान — पण विवेकाची सोबत.

ग्वालियर हायकोर्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी वकिलांचे आंदोलन – सामाजिक न्याय विरुद्ध राष्ट्राचिन्ह प्राधान्याचा वाद

ग्वालियर, जून 2025 — ग्वालियर हायकोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 10 फुटी पुतळा बसवण्याच्या…

Read More

दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी

oplus_1025

<a class="a2a_button_facebook" href="https://www.addtoany.com/add_to/facebook?linkurl=https%3A%2F%2Fprakashparva.in%2F%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%2F914&linkname=%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A5%87%20%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80"…
Read More

एअर इंडिया फ्लाइट १७१ दुर्घटना : अहमदाबादहून लंडनला निघालेलं विमान कोसळलं; २४२ पैकी फक्त एकच प्रवासी वाचला.

अहमदाबाद | १२ जून २०२५ एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं फ्लाइट १७१ हे बोईंग ७८७ विमान…

Read More
कंधार तालुका प्रतिनिधी - बालाजी सुनिल गायकवाड

१६ वर्ष देशाची सेवा करुन संगमवाडी गावात परतणाऱ्या हवालदार आदिनाथ घुगे यांचे जंगी स्वागत.

कंधार तालुका प्रतिनिधी – बालाजी सुनिल गायकवाड – भारतीय सैन्यदलात १६ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त…

Read More

वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना विविध विषयासाठी निवेदन सादर

जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्हाभर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने 9/6/ 2025…

Read More

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com