जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्हाभर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने 9/6/ 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले

जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्हाभर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने 9/6/ 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने खालील विषय होते
1) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि महिला व बाल संगोपन योजनेला निधी मंजूर न करता लाडक्या बहिणीसाठी वापरला तो पुन्हा सामाजिक न्याय विभागाला वर्ग करण्यात यावा
2) संजय गांधी व श्रावण बाळ निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मानधन मिळाले पाहिजे
3) ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या कोणत्या कारणामुळे काढल्या त्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी व महिलांना न्याय देण्यात यावा
4) आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश फार्म ऑफलाइन स्वीकारले जावेत

5) सामाजिक न्याय विभाग मार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा निधी दुसऱ्यांदा अनुसूचित जातीचा 410 कोटी म्हणजेच आतापर्यंत 7000 कोटीचा निधी व आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा 335 कोटी आतापर्यंत आदिवासीचा 1007 कोटी लाडक्या बहिणीसाठी निधी वळविण्यात आला. ही बाब अत्यंत क्लेश दायक असून संविधानाची अवहेलना करणारी आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन वरील वापरलेला निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात यावा. महिला व बाल संगोपन योजनेला निधी मंजूर न करता सरकारला अनाथांचा विसर पडला त्यामुळे एक लाख मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तात्काळ हा निधी महिला व बालसंगोपन विभागाला उपलब्ध करून देण्यात यावा.
6) श्रावण बाळ जिल्ह्यात संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिल्या जाते मात्र गेल्या 3 महिन्यापासून सदर मानधन मिळालेले नाही. ही बाब गंभीर असून निराधारांना सरकार कायमस्वरूपी निराधार करते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध, विधवा, अपंग, निराधार नागरिकांसाठी हे मानधन जीवनावश्यक आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे. तरी हे मानधन निराधारांना ताबडतोब मिळाले पाहिजे.

7) ऊसतोड महिला कामगारांच्या 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढून घेतल्या. ही बाब समोर आल्यानंतर बीडमध्ये आरोग्य विभागाने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 मध्ये 2022 आरोग्य शिबिर आयोजित केली होती. सदर महिलांची काही अपवाद वगळता खाजगी दवाखान्यामध्ये गर्भ पिशवी काढण्याची ऑपरेशन झाली. कुणी याबाबत जबरदस्ती केली का ? या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून सत्य बाब उघडकीस आणावी व सदर ऊसतोड महिला कामगारांना न्याय देण्यात यावा.
8) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच या वर्षामध्ये ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुरू केली. असून त्याची मुदत पाच जून 2025 रोजी संपत आहे .आज रोजी या ऑनलाइन चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना फार मोठा त्रास होत आहे .वेबसाईट बंद किंवा नेटवर्क उपलब्ध नसणे इत्यादी तक्रारी विद्यार्थ्याकडून येत आहेत. कॉम्पुटर सेंटरवर मोठ्या प्रमाणावर लाईन लागली असून या विद्यार्थ्याकडून पैसा वसूल केला जात आहे. त्यामुळे मागच्या वर्षी ग्रामीण भागामध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिला जात होता. तीच पद्धत यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात यावी. तसेच या प्रवेश प्रक्रियेला 20 जून पर्यंत किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी.

वरील सर्व मागण्याची तात्काळ नोंद घेऊन त्या शासन दरबारी निकाली काढण्यात याव्या. अन्यथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शासनाला देण्यात आला यावेळी खामगाव येथे निवेदन सादर करण्यासाठी विशाखा ताई सावंत महिला जिल्हाध्यक्ष संघपाल जाधव उपसभापती क्रु. ऊ.बा. समिती , सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष, राजूभाऊ हॅलोडे संचालक क्रु. ऊ. बा. समिती, दादाराव हेलोडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, रमेश गवारगुरु, मनोहर जाधव, सुनील वाकोडे, शेषराव तायडे ,अंबादास दोडे ,बाळू मोरे ,राजवर्धन शेकोकार, मिलिंद कवडे, विशाल तायडे, जगदीश तिडके, नाना वानखेडे, युवराज पोळे, भारती जगताप, अनिता बोचरे ,अनिता चव्हाण ,दिलीप जाधव, बंडू भाऊ, इंगळे,प्रशांत दमदाडे, विजय मांडकेकर, विशाल हिवराळे गणेश जगताप, नंदा सुनील लांडगे, सीमा विनोद लांडगे, अनिता सिद्धार्थ नितोने, सुशीला जगदेव शिरसाठ, सपना गवई, विमल शिरसाठ, सुमन शिरसाट, यमुना शिरसाठ, प्रमिलाबाई सूर्यवंशी, निर्मलाबाई हिवराळे या संख्या महिला पुरुष उपस्थित होते