
कंधार तालुका प्रतिनिधी – बालाजी सुनिल गायकवाड – भारतीय सैन्यदलात १६ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले हवालदार आदिनाथ घुगे आपल्या जन्मभूमि त दाखल झाले.त्यांचा गावकऱ्यांनी सपत्नीक जंगी सत्कार केला.आदिनाथ घुगे यांनी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कार, प्रेम, स्नेह हा प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्न असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील संगमवाडी या गावी पाहायला मिळाला. १६ वर्ष देशाचं रक्षण करून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन हवालदार आदिनाथ घुगे सुखरूप घरी पोहोचला.
देशसेवा करून गावी पोहोचल्यावर जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावंच नव्हे, तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली. यावेळी पूर्ण गाव सजून-धजून उभं होतं. जवानाचा गावात प्रवेश होताच फटाक्याची आतीषबाजी करत कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. १६ वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
भारतीय सैन्य दलात आदीनाथ घुगे यांनी १६ वर्षे देशसेवा केली. सेवानिवृत्तीनंतर आपल्या जन्मभूमीत दि.३ जुन रोजी सुविद्य पत्नी आश्विनी घुगे सह त्यांचे आगमन झाले,त्यांचे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी वाजंत्री सह स्वागत केले यावेळी सुहासिनींनी ओवाळणी करून पुष्पवृष्टी केली,भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संगमवाडीचा परिसर दुमदुमून गेला.
लोहा येथील बालाजी मंदिर येथून रॅली कंधारकडे निघाली त्यांचा जागोजागी सत्कार करण्यात आला.कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परत रॅली संगमवाडी कडे निघाली रात्री ७ वाजता त्यांचे आगमन संगमवाडी येथे झाले.त्यांचे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी वाजंत्री सह स्वागत केले, कंधार तालुक्यातील संगमवाडी येथे रात्री ७ नंतर गावकऱ्यांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडी कडून भव्य दिव्य लोहा-कंधारचा पारंपारिक खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्कार आयोजित करण्यात आला होता.
सूत्रसंचालन भास्कर गित्ते यांनी केले तर प्रास्ताविक संभाजी घुगे यांनी मांडली तर आभार एकनाथ घुगे यांनी मानले . फौजी आमच्या गावचा कविता भास्कर गित्ते यांनी सादर केली.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की भारत देशातील जवान डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करतो,जवान सीमेवर लढतो म्हणून आपण सुखान राहतो प्रा.हाके म्हणाले,आपले मुलं बाळे शिकवली पाहिजे,गोरगरीब मुलांसाठी थोड थोड मार्गदर्शन करत जा त्यांचा फायदा गावांतील मुलांना होऊ द्या असे म्हणाले.
आईवडिलांना वेळ द्या,तुम्ही इंडीयन आर्मी चे सैनिक आहात त्यांच्यातला वेळ काढून जे युवक आहेत,तो वाईट गोष्टी साठी गेला नाही पाहिजे त्यांना फ्री ट्रेनिंग द्या,जर तुम्हाला वेळ भेटला तर त्यातील थोडा वेळ गावांसाठी द्या गावकऱ्यांची सेवा करा असे चुकलवाड म्हणाले.
यावेळी उपस्थित ओबीसी नेते लक्ष्मण हाके,चंद्रसेन पाटील सुरणर,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चुकलवाड,सरपंच प्रतिनीधी चक्रधर घुगे , केरबा केंद्रे,विजय केंद्रे, माधव मुसळे,उत्तम चव्हाण,व्यंकटी तेलंगे, रामकिशन मानसपुरे यांच्यासह पंचक्रोशीतील व गावांतील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.