
प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! राज्यातील बोगस दिव्यांगांवर मोठी कारवाई सुरू होणार आहे.IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून धडाकेबाज पावलं उचलली आहेत.आदेश :राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना १८ सप्टेंबर रोजी अधिकृत पत्र जारी जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम, प्रशासन अशा सर्व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पडताळणी दिव्यांग प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी सुरू बनावट प्रमाणपत्र आढळल्यास सवलती तत्काळ रद्दकायद्याचे
तरतुदी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६, कलम ९१ नुसार कारवाईदोषी व्यक्तीला २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात वास्तव :राज्यभरात
बोगस दिव्यांगांचा आकडा वाढत चालला आहेअनेक अधिकारी-कर्मचारी खोट्या प्रमाणपत्रांवर सवलती घेत आहेत खरी दिव्यांग मंडळी मात्र हक्कांपासून वंचित राहत आहेत तुकाराम मुंढेंचं स्पष्ट मत : “
प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने व समाधानाने जगण्याचा हक्क आहे” “बोगस लाभ घेणाऱ्यांमुळे खरी गरज असलेले दिव्यांग वंचित राहू नयेत”“समाजातील प्रत्येक दिव्यांग सक्षम झाला तरच समाज खऱ्या अर्थाने सक्षम होईल” पुढील कार्यवाही : जिल्हा परिषदा १ महिन्याच्या आत अहवाल सादर करणार पडताळणीनंतर फक्त लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्यांनाच लाभ४०% पेक्षा कमी अपंगत्व असल्यास कुठलाही लाभ नाही आधी घेतलेले लाभ परत वसूल करण्याची तयारी आता बोगसगिरीला चाप बसणार खरी मदत फक्त खरी हक्कदार दिव्यांगांना!



