19.5 C
New York
सोमवार, जून 16, 2025

Buy now

spot_img

अंबड नगर परिषदेच्या मुख्य दालनात महापुरुषांच्या प्रतिमा नाहीत – शहरात तीव्र नाराजीचा सूर

🖊 अंबड तालुका प्रतिनिधी – रामकिसन अवधूत

🗓 दिनांक: १३ जून २०२५

अंबड – अंबड नगर परिषदेच्या मुख्य दालनात आजवर राष्ट्रपुरुष आणि थोर समाजसुधारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे वास्तव सध्या शहरात चर्चेचा व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असलेल्या मुद्द्यांपैकी एक ठरत आहे.

नगर परिषदेच्या मुख्य दालनात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यासाठी कोणतीही जागा नियोजित करण्यात आली नसल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येते. हा प्रश्न शिवसेना नेते मा. श्री. राहुल व्ही. खरात यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. मनोज उकीरडे यांना छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा औपचारिकरित्या भेट दिल्या. मात्र, त्या प्रतिमा आजतागायत कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आल्या नाहीत.”प्रतिमा केवळ सौंदर्यासाठी नव्हे – तर मूल्यांचे प्रतीक”या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मा. श्री. राहुल व्ही. खरात म्हणाले की,> “महापुरुषांच्या प्रतिमा फक्त भिंतीवर टांगण्यासाठी नसतात, त्या एक आदर्श व विचारसरणीचं प्रतीक असतात. त्या आपल्याला प्रेरणा देतात. नगर परिषदेच्या मुख्य दालनात अशा महापुरुषांची अनुपस्थिती ही लाजिरवाणी बाब आहे.”शहराच्या प्रशासनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या संस्थेने अशा प्रकारची दुर्लक्ष करणे म्हणजे केवळ असंवेदनशीलता नसून, सामाजिक आदर्शांपासून दुरावल्याचा लक्षणीय नमुना आहे.मुख्याधिकारीवर कामकाजाविषयी गंभीर आरोपमुख्याधिकारी मनोज उकीरडे यांच्यावर केवळ या प्रकरणातच नव्हे तर शहरातील इतर विकासकामांबाबतही दुर्लक्ष केल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.विशेषतः –मान्सूनपूर्व कामांची तयारी केली गेलेली नाही,

रस्ते व जलनिकासी व्यवस्थेची दुरवस्था,घनकचरा व्यवस्थापन,पाणीपुरवठा योजना,शहर स्वच्छता व विद्युत व्यवस्था यांकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले आहे.मुख्य बाजारपेठेत व शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचत असून नागरी जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

नगरपरिषदेला इशारा – अन्यथा आंदोलन

या विषयावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. उकीरडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.शिवसेना नेते राहुल खरात यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,> “जर लवकरात लवकर मुख्य दालनात महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नाहीत आणि नागरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com